पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च2026 पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे या ध्येयाकडे चांगले काम सुरू आहे. महाराष्ट्राने ते अंतिम टप्प्यात आणले आहे. लवकरच आम्ही संपूर्ण परिसरातील सुरक्षा पोकळी भरून काढू, पोलिसांचे वर्चस्व असेल आणि मार्च 2026 पर्यंत आम्ही हे लक्ष्य साध्य करू."असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आम्हाला माहिती आहे की जंगलात नक्षलवाद संपताच शहरी माओवादी मोठ्या प्रमाणात सक्रिय होतील. आपल्यालाही याचा सामना करावा लागेल कारण ते आपल्या संस्थांना बदनाम करू इच्छितात, लोकांचा संस्थांवरील विश्वास उडवू इच्छितात आणि देशात अराजकता पसरवू इच्छितात. शहरी माओवादी हेच करण्याचा प्रयत्न करतात. याविरुद्धची लढाई सुरूच राहील.