महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण

शनिवार, 31 जुलै 2021 (12:53 IST)
औरंगाबादमध्ये वीजबिल वसूलीसाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज पुरवठा खंडित केल्याच्या घटनेवरून तिघांनी मारहाण केल्याचे वृत्त मिळाले आहे.ही घटना अंबरहील आणि माळीवाडा या भागात घडली.
 
महावितरण कंपनीचे सहायक अभियंता संतोष गिरजाबा सुर्वे  हे थकबाकीदारांकडे वसुलीसाठी गेलेले असताना आमचा वीजपुरवठा खंडित का केला असं म्हणत विठ्ठल तुकाराम औताडे,भारत साहेबराव शेजवळ आणि शरद अनिल लोखंडे या तिघांनी त्यांना मारहाण केली.
 
या नंतर सुर्वे यांनी या घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना देत तक्रार नोंदविली.त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
तर वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र कारभारी वाघमारे आणि दुर्योधन नारनवरे असे दोघे थकीत विज बिल वसुलीकरण्यासाठी गेले असताना त्यांना भारत शेजवळ आणि शरद लोखंडे यांनी वाघमारे व त्यांचे सहकारी नारनवरे यांना मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच त्यांना धक्का बुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली.त्यावरुन दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती