पालघरमधील औषध कंपनीत नायट्रोजन वायू गळतीमुळे चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू

गुरूवार, 21 ऑगस्ट 2025 (21:26 IST)
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमध्ये असलेल्या एका औषध कंपनीत नायट्रोजन वायू गळतीमुळे चार कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १३० किमी अंतरावर असलेल्या बोईसर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या मेडली फार्मा येथे दुपारी ही घटना घडली अशी माहिती समोर आली आहे. 
ALSO READ: नवनीत राणांची पुष्पा स्टाईल व्हायरल
अधिकारींनी सांगितले की, सहा कर्मचाऱ्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे सायंकाळी ६.१५ च्या सुमारास चार जणांचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितले की, इतर दोघांना स्थानिक रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
ALSO READ: मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव आणि शरद पवार यांच्याशी चर्चा केली, उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीए उमेदवाराला पाठिंबा मागितला
तसेच कंपनीत अल्बेंडाझोल औषध तयार केले जात होते. या दरम्यान नायट्रोजन वायू मिसळताना अचानक गळती झाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
ALSO READ: अमरावती मध्ये जावयाने केली सासऱ्याची हत्या; सासू गंभीर जखमी
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती