पुराचे थैमान : महाराष्ट्रात 149 लोक मृत्युमुखी,100 हून अधिक बेपत्ता

सोमवार, 26 जुलै 2021 (10:14 IST)
महाराष्ट्राच्या काही भागात पूर,भूस्खलन आणि पाऊस यांच्याशी संबंधित अनेक घटनांमध्ये आतापर्यंत सुमारे 149 लोक मरण पावले आहेत, तर100 लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.
 
मीडिया रिपोर्टनुसार या घटनांमध्ये 50 हून अधिक लोक जखमीही झाले आहेत.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा, सांगली आणि कोल्हापूरचे हवाई सर्वेक्षण करू शकतात. रविवारी आदल्या दिवशी ठाकरे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे गेले होते. स्थानिक लोकांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबविला आणि त्या भागात पावसामुळे होणाऱ्या अडचणींबद्दल सांगितले.
 
सांगलीतील पूरग्रस्त भागात सैन्य बचाव मोहीम राबवित आहे. एनडीआरएफ वाळवा भागातील मदतकार्यात व्यस्त आहे. आतापर्यंत शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, परंतु बरेच अजूनही मदतीची वाट पाहत आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती