इंस्टाग्रामवर प्रेमाचे घातक परिणाम, भावनेच्या भरात साताऱ्यामध्ये तरुणीची आत्महत्या

गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (16:06 IST)
महाराष्ट्रातील सातारा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार एक मुलगी इंस्टाग्रामवर एका मुलाच्या प्रेमात पडते. यानंतर दोघांमध्ये लग्नाची चर्चा सुरू झाली. सत्य बाहेर आल्यानंतर मुलीने आत्महत्या केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. 
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय एक तरुणी रुतुजा आणि दुसरी तरुणी गायत्री एकमेकांच्या मैत्रिणी होत्या. गायत्रीने गंमतीने एका मुलाच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट बनवले आणि त्याच अकाउंटवरून रुतुजाला  मेसेज करायला सुरुवात केली. मग हळूहळू दोघेही बोलू लागले आणि प्रेमात पडले. रुतुजात्या फेक अकाउंटला तिचा बॉयफ्रेंड मानू लागली. तर ना ती कधी भेटली होती ना त्यांच्यात भेट झाली होती.
 
रहस्य उघड होईल या भीतीने हे कृत्य केले-
दोघांमधील प्रेम इतके वाढले की रुतुजा लग्नाबाबत बोलू लागली. तरुणी प्रेमात खूप भावूक झाल्याचं  गायत्रीला ला समजले. तेव्हा तिला वाटलं की हे गुपित उघड झालं तर ते योग्य होणार नाही. यानंतर गायत्रीने मुलाच्या वडिलांच्या नावाने बनावट खाते तयार केले आणि तिचा मुलगा आजारी असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा मेसेज रुतुजाला केला केला.
 
हा सर्व प्रकार कळल्यानंतर रुतुजाला धक्काच बसला. यानंतर रुतुजाने आपण जीवन संपवणार असल्याचे सांगितले आणि असे सांगून तिने आत्महत्या केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुतुजाचा फोन तपासला. एका मुलाच्या नावाने आयडी घेऊन चॅटिंग केल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी ऋतुजाची मैत्रिण गायत्री हिला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती