विधान परिषदेतील नऊ जागा रिक्त होत असून, या जागांसाठी निवडणुका होणार आहे. विधान परिषदेत निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्याची प्रशंसा केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणात मतभेद असतात आणि कधीकधी भूमिका वेगवेगळ्या असतात. कधी आम्ही एकत्र असतो, कधी भांडतो. पण राजकारणात यापलीकडचे एक नाते असते. ते नाते सहप्रवाशाचे असते, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा आमचा प्रवास अनेक वर्षांचा आहे. आम्ही अनेक वर्षांपासून सहप्रवासी आहोत. आम्हाला समाज आणि राज्यासाठी एकत्र अनेक चांगली कामे करण्याची संधीही मिळाली आहे. खरे तर, उद्धव ठाकरे यांच्या स्वभावात आणि व्यक्तिमत्त्वात राजकारण फार कमी आहे. मुळात, त्यांचा स्वभाव राजकारण्यासारखा नाही. असे म्हटले जाते की, उद्धव ठाकरे यांचा स्वभाव असा आहे की, एकदा निर्णय घेतला की ते त्यावर ठाम राहतात.