या योजनेअंतर्गत रेशनकार्डधारकांना, 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 लिटर पामतेल आणि 1 किलो चणाडाळ मिळायची.आता ही योजना राज्यातील तिजोरीवर अतिरिक्त भार पडल्यामुळे बंद करण्यात येत आहे. ही योजना बंद केल्यामुळे आता रेशनकार्डधारकांना सणासुदीला सरकारकडून मिळणारे खाद्यपदार्थ मिळणार फक्त 100 रुपयांत मिळायच्या आता त्यांना या वस्तू बाजारातून खरेदी करावे लागणार आहे.
आनंदाचा शिधा या योजनेत रेशनकार्डधारकांना सणासुदीच्या काळात रेशनच्या दुकानातून 100 रुपयांमध्ये चणाडाळ, साखर, रवा, पामतेल मिळत असायचे. तसेच कोट्यावधी लाभार्थींना या किटचे वाटप केले जात होते. प्रत्येक सणाला 350 कोटींची तरतूद करण्यात आली होती. आता ही योजना बंद केल्यामुळे कोट्यावधी लाभार्थींना फटका बसला आहे.