Amravati :मटण खाऊन आला म्हणून भारत हरला म्हणत भावाचा खून केला

मंगळवार, 21 नोव्हेंबर 2023 (15:18 IST)
मटण खाऊन आल्यामुळे भारत हरला असं म्हणत एका व्यक्तीने आपल्या वडिलांवर आणि लहान भावावर लोखंडी रॉड ने हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमरावती जवळ अंजनगाव बारी गावांत घडली आहे. या हल्ल्यात लहानभावाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अंकित इंगोले असे या मयत चे नाव आहे. तर वडील रमेश इंगोले हे गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रवीण इंगोलेला अटक केली आहे. 
19 नोव्हेंबर रोजी भारत ऑस्ट्रेलियाचा सामना झाला त्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा  पराभव करत विजेतेपद पटकावले. 
रविवारी आरोपी प्रवीण त्याचा लहान भाऊ अंकित आणि वडील रमेश हे तिघे टीव्हीवर सामना पाहत होते. आरोपीच्या वडिलांनी आणि लहान भावाने रात्री जेवणात मटण खालले आणि जेवण केल्यावर ते हॉल मध्ये आले आणि टीव्ही समोर उभे होते. प्रवीणने मटण खाण्यावरून वडिलांशी वाद घालण्यास सुरु केले. तुम्ही मटण खाऊन आला म्हणून भारत हासामना हरला. असं म्हणत त्याने लोखंडी रॉड ने त्यांच्यावर हल्ला केला.

वडिलांना वाचविण्यासाठी लहानभाऊ मध्ये आला तर प्रवीणने त्याच्या डोक्यावर देखील हल्ला केला. त्याने अंकितला बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. वडील या घटनेत गंभीर जखमी झाले. आरोपीच्या घरात वाद होत असता पाहायला शेजारचे लोक आले असता त्यांना अंकित रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. आणि वडिलांची प्रकृती चिंताजनक होती. लोकांनी  आरोपी प्रवीणला पकडून ठेवले आणि वडिलांना तातडीनं रुग्णालयात नेले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी प्रवीणला ताब्यात घेतलं. पोलिसांनी अंकितचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती