मिळालेल्या माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लाचखोरांना आळा घालण्यासाठी कारवाई करत आहे. गेल्या १० महिन्यांत जिल्ह्यात ७ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेषतः लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वन विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. या लाचखोरी प्रकरणात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील कारवाईमुळे जिल्ह्यातील क्लासवन अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रत्येक सरकारी आणि गैरसरकारी कार्यालयासमोर लाच घेणे हा गुन्हा आहे असे लिहिलेला फलक लावण्यात आला आहे. असे असूनही, काही लाचखोर अजूनही सामान्य नागरिकांकडून पैसे मागत आहे. या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये केलेल्या ५ कारवाईत ७ अधिकारी आणि कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले.
वन विभागात भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह चार लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्यावर, महसूल विभागातील एका लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर आणि शबरी महामंडळातील प्रत्येकी एका लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.