आजपर्यंत कोणत्याही मुस्लिमाने हिंदू सणांमुळे रस्ता बंद असल्याची तक्रार केलेली नाही, परंतु जेव्हा मशिदीत नमाज पठण केले जाते तेव्हा यूपीचे मुख्यमंत्री म्हणतात की, जर बाहेर नमाज पठण केले तर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जातील.असे म्हटले जाते.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी पुढे म्हणाले की, आज मी सोलापूरला येत असताना मला सांगण्यात आले की एक पालखी येणार आहे, लवकर निघा नाहीतर रस्ता जाम होईल. वारीमुळे वाहतूक कोंडी होते, पण आम्ही कधीही विरोध केला नाही.