कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यात जास्तीत जास्त 48 तास काम करण्याचे निश्चित झाले असून एखाद्या कर्मचाऱ्याने दररोजच्या तासांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास त्यांना वाढीव वेतनापोटी दुप्पट रक्कम देण्यात येईल.
सध्या मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, पुणे, हैद्राबाद या शहरातील बहुतेक कार्यालये 5 दिवसांचे वेळापत्रक पाळत आहे. आता नवीन कायद्यांमुळे भारतीय कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपात मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे.