श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव या संस्थेने “आनंद सागर” हा परिसर विकसीत केला आहे, हा परिसर हा अगोदर पडीत होता. याबाबत ग.म. संस्थानाने शासनाकडे मागणी करून या तलावाला विकसीत करण्याची जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी एक निसर्गरम्य परिसर तयार केला आहे.
सन 1999-2000 मध्ये शासनाने ही 101 हे 72 आर पडीत जमीन तलाव सौदर्यीकरणासाठी दिली होती. गेल्या 15 वर्षात श्री गजानन महाराज संस्थानाने या परिसराचा चेहरा मोहरा बदलला असून आज राज्यभरातील पर्यटक या ठिकाणी येतात. परंतु याची लीज संपत आली असल्यामुळे संस्थाने 2012 मध्ये ही लीज वाढवून देण्याबाबत विनंती केली होती. परंतु मागील चार वर्षापासून सदर प्रकरण प्रलंबित होते. त्याला आता यश आले आहे.