रामदास आठवले नागपूरात बोलत होते. आठवले म्हणाले, भाजप-शिवसेनेने आपल्याला जिंकून येणार्या जागा द्याव्या, तसेच त्यासाठी रिपाइंला निवडून आणण्यास सहकार्यही करावी, अशी मागणी केली आहे. विधानसभेसाठी आम्ही 57 जागांची यादी दिली आहे. पण तेवढ्या जागा मिळणे शक्य नसल्याने किमान 20 तरी जागा मिळाव्या, अशी मागणी आहे.
दिवाळीपूर्वी निवडणुका घेण्याचा आयोगाचा विचार लक्षात घेता जागावाटप लवकर व्हावे, असे ते म्हणाले. आम्ही महायुतीचे पहिले मित्र पक्ष असल्याने आम्हाला झुकते माप मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे आठवले म्हणाले.