पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणार्या टेम्पो चालकाने खालापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत टेंभरी गावच्या हद्दीत टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला होता. टायर बदलत असताना मागून आलेल्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात टेम्पोमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले. टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.