संसदेच्या आजपासून सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक बदलाचे वादळ घोंघावणार आहे. हे वादळ देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्वाचे मानले जात असले तरी विरोधकांकडून याला टोकाचा विरोध होण्याची शक्यता असल्याने मोदी सरकारच्या या दुसर्या अधिवेशनामध्ये दिल्लीतील थंडीत ‘गर्मी का एहसास’ होण्याची शक्यता आहे.
कोळसा ठराव विधेयकाची जागा घेणारे विधेयक सादर करण्यालाही सरकारचे प्राधान्य असणार आहे. संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, धर्मनिरपेक्ष जनता दल आणि समाजवादी पक्षाने या विधेयकांबाबत समान भूमिका घेण्याचे ठरविले आहे.