सत्य अखेर बाहेर आले: साध्वी प्रज्ञा

भोपाळ- सुनील जोशी हत्याप्रकरणात निर्दोष सुटका झालेल्या साध्वी प्रज्ञा‍ सिंग ठाकूरयांनी सुटकेबाबत प्रतिक्रिया देताना सत्य अखेर बाहेर आल्याचे सांगितले. तसेच एक देशभक्त दुसर्‍या देशभक्ताची हत्या करू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातही आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा करताना आपल्याला यामधून जामीन मिळेल असे त्या म्हणाल्या. साध्वी प्रज्ञा ही सध्या नायायालयीन कोठडीत असून त्यांच्यावर भोपाळ येथील इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.

वेबदुनिया वर वाचा