मेरठ आणि औरेयाच्या घटनेची दहशत सध्या सर्वत्र पसरली आहे.त्यावरून घाबरून उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यातील धनघाटा पोलीस स्टेशन परिसरात पतीने आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून देण्याची घटना घडली आहे. पतीने त्याच्या पत्नीसह कोर्टातून करार करून घेतले आणि नंतर पत्नीचे लग्न तिच्या प्रियकरासह मंदिरात लावून दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न 2017 मध्ये झाले होते. लग्नानंतर महिलेला दोन मुलेही झाली. दरम्यान, ती महिला गावातील एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि हे नाते हळूहळू गावात चर्चेचा विषय बनले. महिलेच्या पतीला हे कळल्यावर त्याने प्रथम तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण समझवण्याचा काहीच उपयोग झाला नाही. महिले ने पतीला प्रियकरासोबत राहण्याची इच्छा ऊत्त्त केली. तेव्हा त्याने आपल्या पत्नीचे लग्न पत्नीच्या प्रियकराशी लावण्याचा निर्णय घेतला.
बबलू अनेकदा उदरनिर्वाहासाठी घराबाहेर राहायचा. दरम्यान, राधिका गावातील एका तरुणाच्या प्रेमात पडली.आणि नंतर गावात चर्चा सुरु झाली.पतीने पत्नीला प्रियकराला भेटू नको.असे समजावून सांगितले तरीही तिने ऐकले नाही.