मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमधील बस्सी भागातील यात्रेकरूंचा एक गट बैसाखीच्या दिवशी आनंदपूर साहिबला भेट देण्यासाठी गेला होता. परत येत असताना बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला. जखमींपैकी नऊ जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस, प्रशासन, आणि पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. हा अपघात मंगळवारी रात्री पंजाबमधील बस्सी पठाणा येथील मोरिंदा-चुन्नी रस्त्यावरील हिम्मतपुरा जवळ घडला.