अनेक ठिकाणी एटीएममध्ये पैसे नसल्यानं लोकांची निराशा झाली आहे. काही बँकांमध्ये मोजक्याच लोकांना पुरतील एवढी रक्कम होती. त्यामुळे खात्यात पगार जमा होऊनही जमाना नाखूश होता. पैसे काढले तर ते दोन हजार मग म्हणजे सुट्ट्या पैशांचा घोळ निर्माण होत आहे. ज्यांना पैसे मिळत आहेत, त्यांना बहुतेक वेळा दोन हजाराच्या नोटा हाती लागत आहेत. त्यामुळे कुणी सुट्टे देता का सुट्टे असं म्हणण्याची वेळ आली आहे.त्यामुळे पगार आहे तर ए टी एम नाही पैसे आहेत तर सुट्टे नाही अशी स्थिती सध्या तरी पहायला मिळत आहे.