राष्ट्रपतींना पत्र लिहून केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची भाजपच्या आमदारांची मागणी

मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (19:13 IST)
दिल्ली भाजपच्या आमदारांनी पत्र लिहून दिल्ली सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. दिल्ली सरकार बरखास्त करण्याची मागणी करत भाजप आमदारांनी राष्ट्रपतींना निवेदन दिले होते.या वर राष्ट्रपतींनी गृहमंत्रालयाला पत्र पाठवले आहे. 
 
भाजप आमदारांनी 30 ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निवेदन दिल्याचे लिहिले आहे. राष्ट्रपतींच्या सचिवालयाने याची दखल घेतली आहे.त्याची दखल घेत योग्य कारवाईसाठी गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आली आहे.
तर दुसरीकडे दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी म्हणाले की, आगामी दिल्ली निवडणुकीत भाजपने आधीच पराभव स्वीकारला आहे. भाजपला मागच्या दाराने केजरीवाल सरकार बरखास्त करायचे आहे. निवडून आलेले सरकार पाडणे हे भाजपचे एकमेव काम आहे. भाजपला मुख्यमंत्री केजरीवाल यांची भीती वाटते. केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेची सेवा केली आहे. हे भाजपचे नवे षडयंत्र आहे. दिल्ली निवडणुकीत भाजपचा पराभव होईल आणि  भाजपला शून्य जागा मिळणार आहेत.असे अतिशींनी म्हटले आहे. 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती