दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, दहशतवाद संपवण्याची चर्चा... सर्व राजकीय पक्ष एकत्र आले

गुरूवार, 24 एप्रिल 2025 (21:50 IST)
पहलगाम हल्ल्याबाबत दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. बैठकीतून बाहेर पडताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, सरकारच्या प्रत्येक कृतीला पूर्ण पाठिंबा आहे.
ALSO READ: दहशतवादी तहव्वुर राणाला मोठा धक्का, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली
मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार सतत कृती करत आहे. शेजारी देश पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच, पाकिस्तानी राजदूताला बोलावण्यात आले आहे. दुसरीकडे, सर्वपक्षीय बैठकही बोलावण्यात आली आणि हल्ल्यावर चर्चा करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. यावेळी गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. बैठकीत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. या बैठकीत दहशतवाद्यांवर आणि पाकिस्तानवर मोठ्या कारवाईच्या तयारीबाबत चर्चा झाली असावी, असे मानले जात आहे.
ALSO READ: पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व २६ जणांना नुकसानभरपाई मिळेल-मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा
काँग्रेसने दिला पाठिंबा
बैठकीतून बाहेर पडताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, सरकारच्या प्रत्येक कृतीला पूर्ण पाठिंबा आहे. बैठकीला उपस्थित असलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, सर्व पक्षांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा झाली. कोणत्याही कृतीला सरकारचा पाठिंबा आहे.असे देखील ते यावेळी म्हणाले. 
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: सीआरपीएफ जवानाची आत्महत्या, सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडली

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती