महाराष्ट्रात भाजपबरोबर गटबंधन केलेल्या शिवसेनेने बिहार विधानसभेच्या 150 जागा लढवून विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली जेडीयू-राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस यांच्या संमिश्र आघाडीला शह देण्याचे ठरविले असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. बिहारच्या जनतेबद्दल शिवसेनेच्या मनात आकस असल्याचा इन्कार करताना राऊत यांनी शिवसेना ही बिहारच्या जनतेने देशभक्ती, शौर्य व स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जे योगदान दिले आहे ती कधीही न विसरण्याजोगे असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.