मोदी यांनी विश्वासार्हता गमावली

शनिवार, 16 जानेवारी 2016 (10:43 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेची विश्वासार्हता गमावली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, स्टार्ट अप इंडिया आणि कनेक्ट इंडिया या योजना नवे उद्योजक घडविण्यासाठी चांगल्या आहेत. पण देशात गरिबांची संख्याही मोठी आहे. 

मुंबईसारख्या महानगरात कामगार, फेरीवाले, छोटे व्यावसायिक आहेत, त्यांच्यासाठी काय करणार, असा सवाल त्यांनी केला. केवळ इव्हेंट्सचे आयोजन करून आणि भाषणे देऊन स्वच्छ भारत अभियान यशस्वी होणार नाही, असा टोलाही त्यांनी लागवला.

वेबदुनिया वर वाचा