भाईदर परिसरात राहणार्या गुप्ता परिवाराला रविवारी रात्री कोटा ते रतलाम प्रवासादरम्याने रेल्वे पँट्रीकार मधल्या 20 कर्मचार्यांनी मारहाण केली होती. रेल्वेत मिळणार्या रेल नीर ऐवजी दुसर्या कंपनीच्या पाण्याची बाटली का दिली? याचा जाब विचारणार्या गुप्ता यांना पँट्रीकारमधल्या कर्मचार्यांनी मारहाण केली.