केरी यांच्या उपस्थितीत बुधवारी दिल्ली आयआयटीमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते प्रचंड पावसामुळे उशिरा पोहोचले.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना “तुम्ही येथे येताना बोटींचा वापर करता काय?’’ असा प्रश्न विचारत विनोदही निर्माण केला. त्याचबरोबर कार्यक्रमस्थळी उशिरा पोहोचल्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. यापूर्वी सोमवारीही केरी यांना वाहतूक कोंडी आणि संततधार पावसाचा फटका बसला होता.