मुंबईत सर्वत्र सतत मुसळधार पाऊस सुरु आहे.काही भागात तर घरात पाणी शिरल्यामुळे लोकांची तारांबळ होत आहे.मुंबईतील गोरेगाव,अंधेरी,परळ,वांद्रा मध्ये मुसळधार मेघसरी येत आहे.रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत. जागोजागी पाण्याचा महापूर आला आहे.मुंबईला पाणी पुरवठा करणारी मिठी नदी देखील ओसंडून वाहत आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्रात आज मुसळधार मेघसरी कोसळण्याची शक्यता वर्तवून रायगड,रत्नागिरी,पुणे,कोल्हापूर आणि सातारा या काही जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे.