जळगावमध्ये 1500 किलो गांजा जप्त

सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (12:40 IST)
मुंबई- राज्यात सध्या ड्रग्ज विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात असताना मुंबई एनसीबीच्या पथकाने जळगावात एक मोठी कारवाई करत तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. एनसीबीच्या पथाकाने यावेळी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे.
 

Maharashtra: Mumbai NCB team seized 1500 kgs of Ganja near Erandol in Jalgaon district; two people apprehended for questioning. The Ganja was being brought from Visakhapatnam, Andhra Pradesh. pic.twitter.com/JagGQpMiXP

— ANI (@ANI) November 15, 2021
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रतील जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ एनसीबीच्या पथकाने तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एनसीबीने दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला जात होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती