मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील आणि कोकणातील प्रवाशांसाठी एक मोठी भेट तयार आहे. १ सप्टेंबरपासून मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास समुद्री मार्गाने खूप सोपा आणि जलद होणार आहे. महाराष्ट्र सरकार दक्षिण आशियातील सर्वात वेगवान रो-रो (रोल-ऑन रोल-ऑफ) सेवा सुरू करणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर, मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास फक्त पाच तासांत पूर्ण होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू होणाऱ्या या सेवेचा फायदा केवळ मुंबई आणि कोकणातील लोकांनाच होणार नाही, तर पर्यटकांसाठी हा प्रवास एक रोमांचक समुद्री अनुभवही असेल.