असं म्हणतात की जेव्हा एखादा प्रेमात पडतो तेव्हा त्याला आपल्या अवतीभवती प्रेमच दिसते.सध्या कोरोनामुळे लॉकडाउन असल्यामुळे प्रेमीयुगल एकमेकांना भेटू शकत नाही.त्यांची भेट म्हणजे सध्या ऑनलाईनच होत आहे.दूर असल्यामुळे या नात्यात दुरावा येणं देखील साहजिक आहे.त्यामुळे प्रेमभंग होत आहे.प्रेमभंग किंवा ब्रेकअप झाल्यावर प्रेमी युगल जोडप्यांना एकटे वाटते.त्यांना काहीच आवडत नाही.काही तर नको ते पाऊले देखील उचलतात.असं होऊ नये या साठी काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण स्वतःची काळजी घेऊ शकता.चला जाणून घेऊ या.
* कुटुंबासमवेत वेळ घालवा- असं म्हणतात की जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपले कुटुंबातील सदस्यच आपला साथ देतात.ब्रेकअप झाले असल्यास आपला वेळ आपल्या कुटुंबियांसमवेत घालवावा. त्यांच्याशी बोला,त्यांच्यासह खेळ खेळा.असं करून आपण स्वतःला व्यस्त ठेवा.असं केल्याने आपल्याला छान वाटेल.