मैत्रीच झाड प्रत्येकानं लावावं....

कधी कधी मन आपलं काठोकाठ भरून जातं
 
सुख दुःखाच्या अनुभवांची आठवण साठवून ठेवतं
 
अस हे मन कधीतरी मोकळं करावच लागतं
 
मग मैत्री नावाचं संस्थान यासाठीच असतं
 
राग लोभ क्षणात इथे मोकळा होतो
दुःखाचा साठलेला बांध इथे वेगात वाहू लागतो
 
म्हणून मैत्रीच झाड प्रत्येकानं लावावं
नात्यापलीकडचं नातं सर्वांनी मनात जपावं.....

वेबदुनिया वर वाचा