मंदीरात जायचा कंटाळा आला किंवा वेळ मिळाला नाही तर आपण सहज बोलतो देव माणसाच्या मनात असतो मंदीरात जायची काही गरज नाही....!
पण मनातला देव कोणी दाखवु शकतो....?
नाही
कारण
देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवाण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणुन मंदीरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळु नका.