रात्रभर पोट रिकामे असल्याने सकाळी उठल्या उठल्या व्यक्तीला भूक लागते. त्यामुळे पोटभर न्याहारी करणे आवश्यक ठरते. विशेषत: महिलांना सकाळी चांगली न्याहारी करणे हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्यांनी योग्य न्याहारी न केल्यास त्याचा परिणाम गर्भधारणेवर होऊ शकतो. संध्याकाळपेक्षा सकाळी चांगले उष्मांक देणारे पदार्थ घेणे आवश्यक असते. त्यामुळे गर्भधारणेबाबत उद्भवणार्या अडचणी टाळता येतात.