आयपीएल २०२६ नंतर, टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध एकच कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली जाईल. वृत्तानुसार, काही नवीन खेळाडूंना संधी मिळू शकते.
आयपीएल २०२६ नंतर, टीम इंडिया एका नव्या पर्वाची सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. भारताचा पुढील सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघ एकच कसोटी सामना खेळतील. वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह आणि शुभमन गिल यांच्यासह अनेक प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघात स्थान मिळू शकणाऱ्या काही नवीन खेळाडूंची नावे वृत्तांमधून समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुरनूर ब्रार, मानव सुथार, हर्ष दुबे, देवदत्त पडिक्कल, अकीब नबी या नवीन पाच खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळू शकते.