कार्तिक, शिखरच्या खेळीने भारताचा विजय

गुरूवार, 26 ऑक्टोबर 2017 (10:43 IST)
गहुंजे येथील एमसीए स्टेडीयम वर आज झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंड संघाला ६ गडी राखून हरविले आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने २३० धावा केल्या होत्या. हे आव्हान भारतीय संघाने ४ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. भारतातर्फे शिखर धवन आणि दिनेश कार्तिक यांनी अर्धशतक केले.
 
पुढचा सामना कानपूर येथे रविवारी 29 ऑक्टोबर रोजी होणार असून त्या मालिके मध्ये कुणाची सरशी होणार हे या सामन्याच्या निकालावरून समजणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती