सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडूंच्या श्रेणीत, जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, सरफराज खानला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण आणि आशा शोभना यांना सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार देण्यात आला.
2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताचा सर्वाधिक धावा करणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल सचिन तेंडुलकरने बीसीसीआयचे आभार मानले असून, बोर्डाने नेहमीच खेळाडूंना पाठिंबा दिला आहे. 1989 मध्ये मी 16 वर्षांचा होतो, पण आज जेव्हा रविचंद्रन अश्विनने सचिन सर म्हटले तेव्हा मला माझे वय जाणवले.