‘चला हवा येऊ द्या’ होतेय बंद घेतला निरोप

मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (17:13 IST)

आपुलकीचा प्रश्न  तुम्ही हसताय ना .. हसायलाच पाहिजे अर्थात सर्वात जास्त टी आर पी असलेली आणि निलेश साबळे  होस्ट करत असलेली  ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ हा शो निरोप घेणार आहे.  निलेश साबळे यांनी  स्वत: याबाबत सर्वाना  सांगितलं आहे. निलेश म्हणतात की  आता थोडी विश्रांती घेणार आहे, मात्र सिरीज थांबणार नसून लवकर नवीन सीजन येणार आहे  सोमवारच्या एपिसोडमध्ये जाहीर केल आहे. मात्र ही बातमी समजातच प्रेक्षकांना मोटा  धक्काच बसला आहे.

 थुकरटवाडी गावातील कलाकार  श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि निलेश साबळे यांनी प्रेक्षकांना प्रचंड हसवलं आहे. तर हिंदी चित्रपट सृष्टीला सुद्धा दखल घ्यावी लागली होती.  मराठी चित्रपटांना, मालिकांना तसंच कलाकारांना आणि हिंदी सुद्धा  प्रमोशनसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध मिळाल होत.यामध्ये हिंदी चित्रपट दुनियेतील  कलाकार आमीर खान, सलमान खान, शाहरुख खान, विद्या बालन, इरफान खान, श्रीदेवी, नाना पाटेकर, सोनम कपूर, जॉन अब्राहम, वरुण धवन या कलाकारांनी शोमध्ये आले  होते.  ‘चला हवा येऊ द्या’च्या जागी आता ‘सारेगमप’ हा नवीन शो सुरु होणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती