मृणाल कुलकर्णी, शिवानी रंगोले, सिद्धार्थ मेनन यांच्यासोबत इंद्रनील सेनगुप्ता हा हिंदीतला चेहरा या चित्रपटामधून पहिल्यांदाच मराठीमध्ये झळकणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव आणि इरॉसच्या क्रिशिका लुल्ला यांनी एकत्रितपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नात्यांची बदलती कहाणी मांडणारा हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटामधला नवा प्रयोग मानला जात आहे.