खाद्यतेल महागणार ! सामान्य माणसांचा बजेट बिघडणार

मंगळवार, 26 एप्रिल 2022 (10:24 IST)
जगातील अग्रगण्य पाम तेल उत्पादक इंडोनेशियाच्या खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या घोषणेने बाजारातील चिंता वाढली आहे. इंडोनेशियातून होणाऱ्या एकूण खाद्यतेलापैकी 60 टक्के निर्यात भारताचा आहे. बंदी लागू होण्यापूर्वीच तेलाच्या किमती वाढत आहेत. अन्न मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशातील सात शहरांमध्ये भाजीपाला तेलाच्या (पॅक्ड) किरकोळ किमतीत 13 रुपयांवरून 16 रुपये प्रति किलोपर्यंत वाढ झाली आहे. इंडोनेशियाने 28 एप्रिल 2022 पासून पाम तेलाची निर्यात बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. हे निर्बंध पुढील आठवड्यापासून गुरुवारपासून लागू होणार असून ते अनिश्चित काळासाठी लागू राहणार आहेत.
 
इंडोनेशियातून पाम तेलावर बंदी घालण्याची घोषणा अशावेळी आली आहे जेव्हा देशातील काही शहरांमध्ये वनस्पती तेलाच्या (पॅक्ड) किंमती गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने वाढत आहेत. अन्न मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, दोन आठवड्यांत पॅक केलेल्या वनस्पतिची दैनिक किरकोळ किंमत वाढून
13रुपयांवरून 16 रुपये प्रति किलो झाली आहे.
 
नॅशनल इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ कुकिंग ऑइल - सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) ने सरकारला ताबडतोब G2G सुरू करण्याचा सल्ला दिला आहे, म्हणजे या समस्येला सामोरे जाण्यासाठी दोन्ही सरकारांमध्ये थेट संवाद साधावा. बंदीनंतर त्याचा भारतावर मोठा विपरित परिणाम होण्याची भीती उद्योग जगताला वाटत आहे.याचा आपल्या बाजारावर गंभीर परिणाम होईल कारण आपले अर्ध्याहून अधिक पामतेल इंडोनेशियातून येते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती