मागील दहा दिवस केंद्र सरकार व सराफांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेमध्ये सुमारे ७० टक्के मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप काही मुद्यांवर तोडगा निघालेला नाही. यासंदर्भात शुक्रवारी दिल्लीमध्ये देशातील विविध सराफ संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीमध्ये देशपातळीवर ऑल इंडिया अॅक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली.