हैदराबाद- केंद्रीयमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी एनडीए सरकारकडून एलपीजी ग्राहकांना दिली जाणारी सबसिडी हटवण्याचा विचार सुरू केला आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांची एलपीजी सबसिडी हटवली जाणार आहे.
केंद्रीय शहरी विकास आणि संसदीय कार्यमंत्री नायडू यांनी म्हटले आहे, मला पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान यांनी माहिती दिली आहे की, सरकारला अनेक अवैध गॅस कनेक्शन्सबद्दल माहिती झाली आहे. अशा ग्राहकांना दिला जाणारा गॅस थांबवून सरकार करोडो रुपये वाचवू शकणार आहेत.