देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. गुगल इंडिया लवकरच भारतातील 400 रेल्वे स्थानकांवर मोफत हायस्पीड वायफाय सुविधा पुरवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजीटल इंडिया मिशन’च्या अंतर्गत हा प्रकल्प रेल्वे मंत्रालय आणि गुगल इंडिया हाती घेणार आहे.