हार्ट ऑफ एशिया संमेलनात बोलताना स्वराज म्हणाल्या की, दहशतवादी कारवायांना कुठल्याही स्वरूपात आश्रय देण्यात येऊ नये. त्यासाठी भारताने पाकिस्तानला विकासासाठी सहकार्य करण्याचा प्रस्ताव दिला. पाकिस्तानसोबत विकासाच्या वाटेवर पुढे जाण्यासाठी किंबहुना त्यांना सहकार्य करण्यासाठी आमची तयारी तर आहेच; पण तूर्तास अफगाणिस्तानच्या मदतीचा संकल्पही करण्याची गरज आहे.