शास्त्रानुसार मनुष्याला मिळणारे सुख-दुःख त्याच्या कर्माचे फळ असते. काही लोक नकळतपणे असे काही चुकीचे काम करून जातात, जे सामान्य असतात परंतु त्याचे महत्त्व खूप असते. जर एखाद्या मनुष्याला खूप कष्ट करूनही पाहिजे तेवढा पैसा मिळत नसेल तर, निश्चितच त्यामागे नकळतपणे त्याच्याकडून झालेले अधार्मिक कर्म असू शकतात.
जर एखादा व्यक्ती नेहमी उशीवर बसत असेल तर ती उशी खराब होते आणि आरामदायक राहत नाही. अशा उशीवर डोके ठेवून झोपणाऱ्या व्यक्तीला शांत झोप लागत नाही. अनेकवेळा अशुभ स्वप्न पडण्याची शक्यता असते. अनिद्रा, डोकेदुखीचा त्रास आणि मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.