पवन कल्याणः 2019 चा दारूण पराभव ते 21 जागांवर विजय, या सुपरस्टारनं असं बदललं आंध्र प्रदेशचं राजकारण

शुक्रवार, 14 जून 2024 (09:39 IST)
टीडीपी-भाजप-जनसेना युतीच्या यशात महत्त्वाची भूमिका बजवलेल्या पवन कल्याण यांनी आंध्रप्रदेशचे मंत्री म्हणून शपथ घेतली.पवन कल्याण पीथापुरम मधून 70 हजार 279 मतांनी विजयी झाले. आणि त्यांची विधानसभेत प्रवेश करण्याची इच्छा पूर्ण झाली.
 
राजकीय विश्लेषकांच्या मते, राजकारणात संयम खूप महत्त्वाचा असतो, आणि हाच संयम जनसेनेने आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत दाखवला.
 
पवन कल्याण हे पीथापुरम मधून निवडणूक लढवत असल्याची घोषणा होताच जनसेना कार्यकर्त्यांनी त्यांचा विजय निश्चित आहे समजून आनंदोत्सव साजरा केला.
 
पवन यांना एसव्हीएसएन वर्मा पाठिंबा देतील की नाही याबाबत शंका होती.
 
पण युतीचे सरकार आल्यावर वर्मा यांना पुरेसा पाठिंबा देऊ असं पवन कल्याण यांनीही सांगितल्याने तेलुगू देसम आणि जनसेनेसाठी एकत्र काम करणं सोपं झालं आहे.
 
पवन कल्याणला यांना पराभूत करण्याच्या उद्देशाने वायसीपीने कापू समाजातील वनगीता यांना उमेदवारी दिली होती. विश्लेषकांच्या मते, वायएसपीला वाटलं की मतांचं विभाजन होऊन पवनला पराभूत करता येईल.
 
दुसरीकडे, मुद्रागडा पद्मनाभम सारख्या लोकांनी पवन कल्याणचा पराभव होणार असं सांगितल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष पिथापुरमकडे लागलं होतं.
 
कोटमीचा नायक पवन कल्याण
जनसेना पक्षाच्या स्थापनेला 8 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, पवन कल्याण यांनी 14 मार्च 2022 रोजी गुंटूर जिल्ह्यातील इप्पटम गावात झालेल्या बैठकीत 'मी सरकारविरोधी मतांचं विभाजन करणार नाही' अशी घोषणा केली.
 
या घोषणेमुळे आंध्रप्रदेशच्या राजकारणात बदल झाल्याचं मानलं जात आहे. तोपर्यंत 2019 प्रमाणेच 2024 ची निवडणूक जनसेना एकटीच लढवेल असं वाटत होतं.
 
पण, पवनच्या घोषणेनंतर जनसेना आणि तेलगू देसम एकत्र येतील असे आडाखे बांधले जाऊ लागले.
 
जनसेना पक्षाच्या स्थापनेला 8 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, पवन कल्याण यांनी 14 मार्च 2022 रोजी गुंटूर जिल्ह्यातील इप्पटम गावात झालेल्या बैठकीत 'मी सरकारविरोधी मतांचं विभाजन करणार नाही' अशी घोषणा केली.
 
या घोषणेमुळे आंध्रप्रदेशच्या राजकारणात बदल झाल्याचं मानलं जात आहे. तोपर्यंत 2019 प्रमाणेच 2024 ची निवडणूक जनसेना एकटीच लढवेल असं वाटत होतं.
 
पण, पवनच्या घोषणेनंतर जनसेना आणि तेलगू देसम एकत्र येतील असे आडाखे बांधले जाऊ लागले.
 
पवनने आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की, "ते माझ्या सभेत आले आणि टाळ्या वाजवल्या. मात्र मतदान केलं नाही, मला याचं दुःख नाही कारण मी तुमच्यासाठी काम करतोय."
 
त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पटवून दिलं की, पक्षाला जर एकाच जागेवर विजय मिळाला तर आपण कसं लढणार?
त्यानंतर पवन यांनी भाजप, टीडीपी आणि जनसेना युतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
 
युती नको, असं म्हणून पक्षात विरोध होता. पण त्यांनी सर्वांना पटवून सांगितल्याचं जनसेनेचे प्रवक्ते कुसमपुडी श्रीनिवास राव यांनी सांगितलं.
 
पवन कल्याण नेहमी सांगतात की, व्यक्तीला माहिती असायला हवं नेमकं जायचं कुठं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ताकदीचा अंदाज बरोबर लावला. आणि युती करण्याच्या उद्देशाने विधानसभेच्या जागा आणि संसदेच्या जागा भाजपकडून नीट वाटून घेतल्या.
 
युतीच्या जागावाटपात, जनसेनेने विधानसभेच्या 21 जागा आणि खासदारकीच्या 2 जागा जिंकल्या, तर भाजपने विधानसभेच्या 10 जागा आणि लोकसभेच्या 6 जागा जिंकल्या.
 
2019 च्या निवडणुकीत भाजपला विधानसभेच्या 10 जागा आणि लोकसभेच्या 6 जागा मिळाल्या होत्या.
 
विशेषतः जनसेनेने ज्या जागा लढवल्या होत्या त्या जागांवर म्हणजेच विधानसभेच्या 21 जागा आणि लोकसभेच्या 2 जागा जिंकल्यामुळे जनसेना 100% निकाल मिळवणारा पक्ष बनला.
 
विश्लेषकांचं म्हणणं आहे की पवन कल्याण यांनी स्वत: बाजूला होऊन युतीचं मूल्य वाढवलं आहे.
 
प्रजासत्ताकाने घडवलेला बदल
जनसेना वेबसाईट उघडल्यावर एक प्रश्न समोर येतो, "एक पाऊल टाकून किती लांबचा प्रवास करणार हे महत्त्वाचं नाही. परिवर्तनासाठी मी राजकारणात प्रवेश केला आहे. माझ्याकडे एक मजबूत राजकीय व्यवस्था आहे. तुम्ही माझ्यासोबत प्रवास करायला तयार आहात का?"
 
वरील प्रश्न पवन कल्याणच्या राजकीय प्रवासाचा आरसा वाटतो. पवन कल्याणला त्याची बलस्थान आणि त्याच्या कमकुवत बाजूंची चांगलीच जाणीव आहे.
त्यांचा मोठा भाऊ मेगास्टार चिरंजीवी यांनी स्थापन केलेल्या प्रजा राज्यम पक्षामुळे त्यांना हा अनुभव मिळाल्याचं सांगितलं जातं.
 
राजकारण आणि चित्रपट यातील फरक पवन कल्याणला समजणार नाही असं नेहमी म्हटलं जायचं.
 
2014 मध्ये पवन कल्याणने जनसेना पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली.
 
त्यानंतर त्यांनी विभाजन झालेल्या आंध्रप्रदेशच्या विकासासाठी आपला पक्ष निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं.
 
विकासासाठी तेलुगू देसम आणि भाजपला पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीत पवन कल्याणने चंद्राबाबू आणि मोदींसोबत प्रचार केला.
 
मोठा पराभव
2014 च्या निवडणुकीपासून 2019 च्या निवडणुकीपर्यंत जनसेनेच्या प्रवासात अनेक बदल झालेत. आंध्रप्रदेशला देण्यात येणारा विशेष दर्जा नाकारून विशेष पॅकेजच्या नावाखाली बनावट पॅकेज दिल्याची टीका पवन कल्याण यांनी केली होती.
 
यानंतर त्यांनी 2019 च्या निवडणुकीत डावे आणि बसपासोबत युती करून निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला.
पवनने गजुवाका आणि भीमावरम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत जनसेनेचा दारुण पराभव झाला. त्यांनी लढवलेल्या दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला. जनसेनेला केवळ एक जागा मिळाली. राजोलू मतदारसंघातून जनसेनेचे रापाका वरप्रसाद विजयी झाले. नंतर तेही वायसीपीच्या बाजूने गेले.
 
त्या निवडणुकीत जनसेनेला 6 टक्के मतं मिळाली होती.
 
2024 च्या निवडणुका
पवन कल्याण यांनी 2024 च्या निवडणुकीत सरकारविरोधी मतांचे विभाजन करणार नाही अशी घोषणा केली.
 
एकीकडे जनसेना आणि टीडीपी एकत्र लढणार की नाही, अशी शंका असताना, दुसरीकडे पवन कल्याण यांनी एकट्याने निवडणूक लढवावी असं म्हटलं जात होतं.
 
शिवाय पवन कल्याण यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊ केली आणि यात्रेमुळे त्यांचा राजकीय आलेख वाढल्याचा विश्वास सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे.
 
अशात 9 सप्टेंबर 2023 रोजी चंद्राबाबूंना पहाटे नंद्याला येथे अटक करण्यात आली आणि त्यांना राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आलं.
यानंतर पवन कल्याणची आणि चंद्राबाबूंची तुरुंगात झालेली भेट ही आंध्रप्रीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरली असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
 
यानंतर पवन कल्याणने 2024 च्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे जाहीर केलं.
 
त्यांच्यासोबत भाजपही एकत्र येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
 
स्वयंसेवकांची टीका
राजकीय विश्लेषकांच्या मते, पवन कल्याण यांनी निवडणुकीच्या प्रचारात मोलाची भूमिका बजावली.
 
जनवाणीच्या कार्यक्रमासाठी विझाग येथे गेलेल्या पवन कल्याण यांना पोलिसांनी हॉटेलच्या खोलीत डांबून ठेवलं. मात्र आंध्रप्रदेशातील महिला बेपत्ता होण्यास स्वयंसेवकच जबाबदार आहेत, असं सांगणाऱ्या त्यांच्या भाषणाने खळबळ उडाली.
पवन कल्याण यांच्या आरोपांनंतर, केंद्रीय गृहमंत्रालयाने आंध्रप्रदेशातील बेपत्ता महिलांबद्दल राज्यसभेत सादर केलेला तपशील लोकांमध्ये चांगलाच गाजला.
 
युती झाल्यानंतर पक्षांतर्गत समस्या बाहेर येऊ न देण्याची काळजी पवन कल्याण यांनी घेतली होती. आता ते विधानसभेत नव्या प्रवासाची तयारी करत आहेत.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती