अलीकडेच, दिलजीत यांनी ग्रॅमीचे अध्यक्ष पानोस पनय यांना दिलेल्या मुलाखतीत कोणाचेही नाव न घेता संपूर्ण वादावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले: "सध्या संपूर्ण जगात युद्धाचे वातावरण आहे. या परिस्थितीवर माझे नियंत्रण नाही, परंतु संगीत ही देशांना जोडणारी शक्ती आहे. आपण राष्ट्रांच्या पलीकडे विचार केला पाहिजे आणि पृथ्वी मातेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण या सर्व सीमा एकाच पृथ्वीचा भाग आहे." या विधानावरून हे स्पष्ट होते की दिलजीत हानिया आमिरच्या समर्थनात उभा आहे, जरी त्याने कोणतीही थेट राजकीय टिप्पणी केली नाही.
तसेच FWICE चे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी दिलजीतवर भारताच्या भावना जाणूनबुजून दुखावल्याचा आरोप केला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की जेव्हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतात २६ लोकांची हत्या केली, तरीही दिलजीतने चित्रपटात एका पाकिस्तानी अभिनेत्रीला घेतले.