कंगनाची मोठी घोषणा, निवडणूक जिंकली तर बॉलिवूड सोडणार!

सोमवार, 6 मे 2024 (15:53 IST)
कंगना रणौत यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे निवडणूक लढवत आहे. भाजपने त्यांना हिमाचल प्रदेशातील मंडी येथून तिकीट दिले आहे. त्यानंतर कंगना जोरदार प्रचारात व्यस्त आहे. या निवडणुकीत त्यांना जिंकण्याची पूर्ण आशा आहे. दरम्यान मीडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कंगनाने त्यांच्या फिल्मी करिअरबाबत एक मोठी घोषणा केली.
 
कंगना राजकारणासाठी बॉलिवूड सोडणार का?
कंगना हातवारे करत म्हणाल्या की, जर मी लोकसभा निवडणूक जिंकली तर मी हळूहळू बॉलिवूडचे जग सोडू शकते. कारण मला फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. जेव्हा कंगनाला विचारण्यात आले की आपण चित्रपट आणि राजकारण कसे सांभाळणार? तर अभिनेत्री म्हणाली की, 'चित्रपट करतानाही मी कंटाळते, त्यामुळेच मी अभिनय आणि दिग्दर्शनही करते. लोक माझ्याशी जोडले जात आहेत असे वाटत असेल तर मी फक्त राजकारण करेन.
 
लोकांना माझी गरज आहे, असे वाटत असेल तर मी त्या दिशेने जाईन. मंडीतून निवडणूक जिंकली तरच राजकारण करेन. अनेक चित्रपट निर्माते मला राजकारणात जाऊ नका असे सांगतात. तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. मी एक गौरवशाली जीवन जगले आहे, जर आता मला लोकांशी जोडण्याची संधी मिळाली तर मी ती देखील पूर्ण करेन. मला वाटतं, लोकांच्या तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्याबद्दल तुम्ही आधी न्याय केला पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती