कंगना राणौत न्यायालयात हजर झाल्या नाही,वकिल म्हणाले की कोविडची लक्षण आढळली

मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (14:04 IST)
मानहानीचा खटल्यात बॉलिवूड अभिनेत्रीला आज मुंबई न्यायालयात हजर होण्यास सांगितले होते,पण ती कोर्टात हजर झाली नाही.अंधेरीतील दंडाधिकारी न्यायालयात हजर न झाल्याबद्दल अभिनेत्रींचे वकिलांनी त्यांची प्रकृती बरी नाही त्यांना कोविडचे लक्षण आढळून आले आहेत असे सांगितले.
 
सांगू या की,जावेद अख्तर यांनी अंधेरीतील दंडाधिकारी न्यायालयात कंगनाच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.या मध्ये कंगनावर टीव्ही झालेल्या मुलाखतीच्या दरम्यान अख्तरविरुद्ध कथितपणे बदनामीकारक आणि निराधार वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.

जावेद अख्तरने कंगनावर आरोप केला होता की,अभिनेत्रीने एका टीव्ही मुलाखतीदरम्यान त्याच्यावर खोटा आरोप केला होता की त्यांनी कंगनाला हृतिक रोशनवर दाखल केलेला खटला मागे घेण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही तर जावेद अख्तरने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, कंगनाने अख्तर यांना आत्मघातकी टोळीचा भाग असल्याचे म्हटले होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती