महिलांचा आदर करायला हवा यावर भर देताना शाहरूख खानने बेंगळूरूमधल्या महिलांच्या विनयभंगाच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. महिलांना चांगल्या दर्जाची वागणूक मिळायला हवी आणि पुरूषांनी महिलांचा सन्मान करायलाच हवा अशी अपेक्षा शाहरूखने व्यक्त केली आहे.