समीराने मल्लिकाला 'रेस'मध्ये मागे टाकले

PRPR
ही काही शर्यतीची वगैरे बातमी नाहीये. अब्बास-मस्तान यांच्या आगामी रेस या चित्रपटाविषयी ही बातमी आहे. या चित्रपटासाठी मल्लिका शेरावतला निवडले होते. पण मधल्या काळात समीरा रेड्डीने असे काय केले कुणास ठाऊक की मल्लिकाचा पत्ता कट झाला आणि समीराला त्या भूमिकेसाठी घेण्यात आले.

अब्बास-मस्तान यांच्या चित्रपटात काम करण्याची मल्लिकाचा फार दिवसांपासूनची ख्वाईश होती. कारण ही दिग्दर्शक द्वयी कलाकारांना फार स्टायलिशपणे सादर करते.

आता मल्लिकाला खो देऊन समीरा कशी तेथे आली ते काही कळले नाही. पण समीराच्या मते, यात काही विशेष नाहीये. बॉलीवूडमध्ये एकाला बदलून दुसऱ्याला घेण्याचे अनेकदा घडते. आपल्याबाबतीतही असे अनेकदा घडल्याचा तिचा दावा आहे.

समीराला रेसमध्ये अतिशय ग्लॅमरसपणे सादर केले जाणार आहे. समीरा गेल्या काही दिवसांपासून बंगाली चित्रपटांत गंभीर भूमिका करतेय. चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता तर तिचे चाहते आहेत. त्यांनी समीराचा तुलना स्मिता पाटीलशी केली आहे.

मुसाफिरनंतर चर्चेत आल्यानंतर समीरा कधी मागे पडली ते तिला आणि प्रेक्षकांनाही कळले नाही. तिचे नंतरचे सगळे चित्रपट फ्लॉप गेले. आता रेसच्या माध्यमातून आपण पुन्हा रेसमध्ये येऊ असे तिला वाटते.

वेबदुनिया वर वाचा