फिल्म इंडस्ट्रीमधील सुरक्षितता अत्यंत भयावह असल्यासारखी बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनला वाटते. विद्याने ‘परिणीता’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आपल्या सहज अभिनयामुळे वेगळी ओळख निर्माण केलेल्या विद्याने ‘कहाणी’, ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘पा’ सारख्या चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
बॉलीवूडमधील तीन भीतिदायक गोष्टी कुठल्या वाटतात असा प्रश्न विद्याला विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना ती म्हणाली, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शूटिंग संपल्यानंतरचा स्टुडिओ, मध्यरात्री सुरू झालेली पार्टी आणि तिसरी गोष्ट म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सतत भासणारी असुरक्षितता.